Monday, November 18, 2019

सत्तरीतील लालपरी!

 १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर या मार्गापासून एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’चा प्रवास सुरू झाला. राज्यातील विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक असलेल्या एसटीने नुकतीच आपली सत्तरी साजरी केली. या सत्तर वर्षांमध्ये एसटीने महाराष्ट्राला जोडले. असं म्हणतात की, रेल्वे ही भारताची एकता जोडून ठेवणारी आहे. तसंच काम या सत्तर वर्षात एसटीने महाराष्ट्रात केले आहे, असं म्हटल्यास चुकीचे ठरू नये. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रस्ते नसलेल्या गावांमध्ये एसटी पोहोचली आहे. हेच एसटीचे बलस्थान आहे. राज्याच्या विकासात सार्वजनिक वाहतूक म्हणून एसटीने आपले भरघोस योगदान दिले आहे. एसटीचा प्रवास जसा थक्क करणारा आहे तसा दिमाखदारही आहे. मात्र, सत्तरी गाठलेल्या एसटीला आज अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
 पूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी क्लिक करा



No comments: