Friday, February 12, 2016


जेएनयुमध्ये घडलेला प्रकार चिंताजनक आणि निंदनिय आहे. झाल्या प्रकारावरून सगळ्याच डाव्या विद्यार्थी संघटना देशद्रोही आहेत असा प्रचार ही सुरू झाला आहे. मात्र, जेएनयु कॅम्पसमधील डाव्या विद्यार्थी चळवळींनी झाल्या प्रकाराचा निषेध नोंदवत आपली भूमिका ही स्पष्ट केली आहे. जेएनयुमधील निंदाजनक प्रकारानंतर कारवार्इच्या नावाखाली आता संघटित विद्यार्थी चळवळीवर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे यात काही शंका नाही.. जेएनयुमधील विद्यार्थी चळवळ ही राजकियदृष्ट्या सजग असल्याचे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय प्रश्न असो किंवा राष्ट्रीय प्रश्न जेएनयू विद्यार्थी परिषद(जुन्सू) वेळोवेळी आंदोलने करत त्याला तोडं फोडले आहे. मागील काही महिन्यांमध्ये जुन्सूच्या बॅनरखाली अनेक आंदोलने झालीत. त्यात पदव्युत्तर शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्याच्या विरोधात ऑक्युपाय युजीसीचे आंदोलन होते, रोहित वेमुल्लाला आत्महत्या करण्यास भाग पाडणा-यांना शिक्षा झाली पाहिजे यासह विविध प्रश्नांवर आंदोलने झाली आहेत. या दरम्यान पोलिसांनी केलेली दडपशाही लक्षात घेतली पाहिजे. निर्भया प्रकरणात एसएफआय आणि जुन्सूच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर देशभरात आंदोलनाचे लोण पोहचले. आता त्यावेळी ही जुन्सू, जेएनयु देशद्रोही होते का ? संघटित विद्यार्थी चळवळ ही सत्ताधारी जमातीला अधिक धोक्याची वाटते. जेएनयुमध्ये घडलेल्या प्रकरणाबाबत संबंधित लोकांवर कारवाइ झाली पाहिजे. मात्र, चोर सोडून संन्याशाला फाशी देता कामा नये. आपल्याकडे स्वयंघोषित विचारवंत आहे. राजकिय भाष्यकार आहेत (याला माझा काही विरोध आणि आक्षेप नाही) मात्र, त्यातील बहुतेक जणांना कम्युनिस्ट चळवळ, कम्युनिस्ट पक्षातील मतभेद, संसदीय प्रणाली मानणारे आणि बंदुकीच्या जोरावर क्रांती आणू पाहणारे कम्युनिस्ट यांच्यातील फरक काय हे विचारले तर काहीजणांची तोंडे बदं होतात तर काही जण थातूरमातूर उत्तरे देतात. बाकी संघिष्टांचा बुद्धीभेद आहेच... असो... पण जेएनयुमध्ये झालेल्या प्रकारावरून कारवार्इच्या नावाखाली दडपशाही करणे आणि संघाच्या विचारधारेला विरोध करणा-या संसदीय प्रणाली मानणा-या डाव्या विद्यार्थी संघटनांना देशद्रोही म्हणून बदनामी करण्याच्या कृतीला विरोध करायला हवा. रात्र नव्हे तर आता दिवस ही वै-याचा आहे. संघटित विद्यार्थी चळवळ वाचली पाहिजे.
----
जाता.....जाता.... : नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणा-या आणि प्रजासत्ताक दिनी काळा दिवस पाळणा-या हिंदुत्ववाद्यांवर कोणत्या कलमातंर्गत कारवाइ करण्यात आली आहे का? कोणाला माहिती असल्यास कळवावी...

दुसरे म्हणजे मुंबर्इत अभाविपच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला होता तेव्हा अभाविपवाले विचारांची लढाइ विचाराने लढावी असे म्हणत होते...जेएनयुमध्ये निंदनिय प्रकार घडल्यानंतर देहराडून आणि लखनऊ या ठिकाणी एसएसएफच्या कार्यालयावर अभाविप आणि संघाच्या गुंडानी हल्ला केला आता अभाविप चे काय म्हणणे आहे ??

No comments: